Chapter 5                  भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा

१. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म कधी झाला?

 उत्तर: १८१७ मध्ये, दिल्ली येथे.


२. सर सय्यद अहमद खान यांना कोणकोणत्या भाषांवर प्रभुत्व होते?

 उत्तर: उर्दू, पर्शियन, अरबी आणि इंग्रजी.


३. ‘आइन-ए-अकबरी’ ग्रंथाचे संपादन कोणी केले?

उत्तर:  सर सय्यद अहमद खान.


४. ‘सायंटिफिक सोसायटी’ कधी स्थापन झाली?

उत्तर:  १८६४ मध्ये.


५. सायंटिफिक सोसायटीचे सदस्य कोणते विषय शिकत होते?

 उत्तर: इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र.


६. सर सय्यद अहमद खान इंग्लंडला कधी गेले?

उत्तर:  १८६९ मध्ये.


७. ‘मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ कोणी स्थापन केले?

उत्तर:  सर सय्यद अहमद खान.


८. ‘मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ चे पुढे काय झाले?

 उत्तर: अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मध्ये रुपांतर झाले.


९. सर सय्यद अहमद खान यांनी कोणते नियतकालिक सुरू केले?

 उत्तर: ‘मोहम्मदन सोशल रिफॉर्मर’.


१०. सर सय्यद अहमद खान यांनी कोणत्या गोष्टींचा पुरस्कार केला?

उत्तर:  आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान.


११. ताराबाई शिंदे यांचा जन्म कधी झाला?

 उत्तर: १८५० मध्ये.


१२. ताराबाई शिंदे यांनी काय लिहिले?

 उत्तर: स्त्री-पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध.


१३. ताराबाई शिंदे यांनी कोणती मागणी केली?

 उत्तर: स्त्री-पुरुष समानतेची.


१४. ताराबाई शिंदे कोणत्या सुधारणेपेक्षा पुढे गेल्या?

उत्तर: विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, सतिप्रथाबंदी.


१५. ताराबाई शिंदे यांच्या विचारांना कोणी पाठिंबा दिला?

उत्तर: महात्मा जोतीराव फुले.


१६. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणते मिशन स्थापन केले?

उत्तर: ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’.


१७. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कुठे शाळा उघडल्या?

उत्तर: मुंबईत परळ, देवनार आणि पुणे येथे.


१८. शाळांव्यतिरिक्त शिंदे यांनी काय सुरू केले?

उत्तर: व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा.


१९. पुण्यातील कोणत्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाशी त्यांचा संबंध आहे?

 उत्तर: पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह.


२०. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या सामाजिक विषयांवर जनजागृती केली?

 उत्तर: दलित शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना.


२१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजउभारणी कोणत्या तत्त्वांवर ठरवली?

 उत्तर: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता.


२२. आंबेडकरांनी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून संदेश दिला?

उत्तर: बहिष्कृत हितकारिणी सभा.


२३. आंबेडकरांचा संदेश काय होता?

उत्तर: "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा."


२४. महाड येथे कोणता सत्याग्रह झाला?

 उत्तर: चवदार तळ्याचा सत्याग्रह.


२५. चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून कोणता मुद्दा मांडला गेला?

उत्तर: सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत.


२६. आंबेडकरांनी कोणता धर्मग्रंथ जाळला?

उत्तर: मनुस्मृती.


२७. नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर: कर्मवीर दादासाहेब गायकवाड.


२८. आंबेडकरांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली?

उत्तर: मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता.


२९. आंबेडकरांनी वृत्तपत्रांकडे कशा दृष्टीने पाहिले?

 उत्तर: जनजागरण व लढा उभारण्याचे हत्यार म्हणून.


३०. कष्टकरी वर्गासाठी आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला?

उत्तर: स्वतंत्र मजूर पक्ष.

Answer by Dimpee Bora