Chapter- 4 नात्यांची घट्ट वीण
१. मूल मोठं झाल्यावर काय करू लागतं?
उत्तर: मूल मोठं झाल्यावर पंख पसरून उडू लागते आणि स्वतःच्या मार्गाने पुढे जाते.
२. मुलांच्या परदेशगमनामुळे आई-वडिलांना काय जाणवतं?
उत्तर: त्या वेळी तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते.
३. आई-वडिलांचं दुःख मुलांना का कळत नाही?
उत्तर: कारण ते आनंदाचा मुखवटा घालून आपलं दु:ख लपवत असतात.
४. आई-वडिलांना मुलांच्या पाठीशी काय करता येतं?
उत्तर: आशीर्वाद देऊन, निःशब्द पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत उभं राहता येतं.
५. आईच्या डोळ्यातून काय झरतं?
उत्तर: आईच्या डोळ्यातून प्रेम, वेदना आणि विरहाचे अश्रू झरतात.
६. वडिलांचे अश्रू का दिसत नाहीत?
उत्तर: कारण ते जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात.
७. नाती जुळण्यासाठी काय आवश्यक असते?
उत्तर: दोन्ही बाजूंनी प्रयत्न आणि सुरुवात आवश्यक असते.
८. जर दोन्ही बाजूंकडून प्रयत्न झाले नाहीत तर काय होते?
उत्तर: नाती निखळतात किंवा तुटतात.
९. मैत्री कशी भावना आहे?
उत्तर: ती अतिशय सूक्ष्म, तरल आणि मनाला जोडणारी आहे.
१०. मैत्री दिसत का नाही?
उत्तर: कारण मैत्री ही भावनेतून निर्माण होते; ती फक्त अनुभवता येते.
११. मैत्री टिकवण्यासाठी काय आवश्यक आहे?
उत्तर: दोघांनीही एकाच वेळी एकच स्वप्न बघण्याइतकी निष्ठा आणि समजूतदारपणा.
१२. जीवनात अनेक नाती का आवश्यक असतात?
उत्तर: कारण माणसाला आधार, मार्गदर्शक, हितचिंतक आणि गुरू यांची गरज असते.
१३. भारतीय परंपरेनुसार गुरूकडून शिक्षण घेतल्यानंतर काय दिलं जातं?
उत्तर: गुरुदक्षिणा.
१४. गुरू शिष्याला काय देतो?
उत्तर: कानमंत्र—जो कठीण काळात मार्गदर्शन करतो.
१५. शेजारधर्म काय आहे?
उत्तर: शेजाऱ्यांसोबत प्रेम, स्नेह, मदत आणि आदराने नातं ठेवणे.
१६. शेजारधर्माचा धागा तुटला तर काय होते?
उत्तर: तो वैराच्या मर्यादा ओलांडतो.
१७. कोणते नातं विसरता येत नाही?
उत्तर: आजीचे नातं.
१८. आजीची आठवण कशी येते?
उत्तर: तिने सांगितलेल्या गोष्टींमुळे आणि तिच्या मायेने.
१९. 'वृद्धाश्रम'चा उल्लेख कोणत्या भावनेने केला आहे?
उत्तर: दु:ख व हुरहूर व्यक्त करण्यासाठी.
२०. नात्यांचा प्रवास कधी सुरू होतो?
उत्तर: जन्मापासून.
২১. वार्धक्यात माणूस काय करू लागतो?
उत्तर: मागे वळून आपल्या आयुष्याचा प्रवास पाहू लागतो.
२२. वय वाढल्यावर कोणते मुखवटे गळून पडतात?
उत्तर: अहंकार, प्रतिष्ठा, मान-अपमानाचे मुखवटे.
२३. त्या वेळी मन कसं होतं?
उत्तर: निखळ, निकोप आणि शांत.
२४. निसर्गाचा ‘नियम’ कोणता सांगितला आहे?
उत्तर: पिकले पान गळले तरी नवी पालवी फुटते.
२५. हा निसर्गनियम का मान्य करावा लागतो?
उत्तर: कारण जन्म-मृत्यू हे शाश्वत सत्य आहे.
२६. जीवनाचा निर्णायक उंबरठा कोणता?
उत्तर: वार्धक्यातला शेवटचा टप्पा.
२७. नात्यांच्या पलीकडचं कोणतं नातं आहे?
उत्तर: मनाचं नातं — शब्दांच्या आभाळालाही अपुरं पडणारं.
२८. हातून काही निसटण्याची भावना कशाला म्हणतात?
उत्तर: हुरहूर.
२९. प्रत्येक शेवटामध्ये काय दडलंलेलं असतं?
उत्तर: एक नवीन सुरुवात.
३०. नात्यांची वीण कशी असते?
उत्तर: घट्ट पकडून ठेवणारी, मनाला जोडणारी.
Answer by Dimpee Bora