Chapter 8


१) होळी झाल्यावर हवामानात काय बदल होत असे?

उत्तर: होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत असे.


२) आंब्यावर काय येऊन घमघमत असे?

उत्तर: आंब्यावर मोहोर येऊन घमघमत असे.


३) परीक्षा कधी यायच्या?

उत्तर: मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा तोंडावर यायच्या.


४) अंगणात अंथरुणं कधी पडायची?

उत्तर: सुट्टी लागल्यावर मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची.


५) मार्च-एप्रिलमध्ये लेखकाला कुठे झोपायला मिळायचं?

उत्तर: मार्च-एप्रिलमध्ये लेखकाला गॅलरीत झोपायला मिळायचं.


६) लेखक झोपताना कोणता आवाज ऐकायची वाट पाहत असे?

उत्तर: कोकिळेचं 'कुहू' ऐकायची वाट पाहत असे.


७) अभ्यास कसा वाटायचा?

उत्तर: अभ्यासाचा आळस वाटायचा नाही, पाठांतर आवडायचं.


८) नेमलेली पुस्तकं कशी वाचली जायची?

उत्तर: गोष्टीच्या पुस्तकांइतकीच आवडीने पुन्हा पुन्हा वाचली जायची.


९) सुट्टीची वाट कशी लागायची?

उत्तर: अभ्यासाचं वहीपुस्तक बाजूला झालं की लगेच सुट्टीची आठवण यायची.


१०) अंगणात कुठलं झाड होतं?

उत्तर: हजारी मोग-याचं झाड होतं.


११) शनिवारवाड्यात काय वेचून आणायचं?

उत्तर: बकुळीची फुलं वेचून आणायची.


१२) माठात काय घालायचे?

उत्तर: माठात वाळा घालायचे.


१३) आई-आत्या काय करायच्या?

उत्तर: कुरडया-पापड्यांची घाई करायच्या.


१४) अंगणात काय पसरायचं?

उत्तर: अंगणभर वाळवणं पसरायची.


१५) कैरीपासून काय बनायचं?

उत्तर: कैरीची डाळ आणि पन्हं बनायचं.


१६) बर्फाचे गोळे कधी मिळायचे?

उत्तर: कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळायचे.


१७) लेखकाला सुट्टीत काय आवडायचं?

उत्तर: खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं वाचायला.


१८) वाड्यात माळा कुठे होता?

उत्तर: वाड्याचा चौथा मजला म्हणजे माळा होता.


१९) लेखकाला माळ्यावर काय करायला आवडायचं?

उत्तर: पुस्तकांच्या गराड्यात बसायला आवडायचं.


२०) पुस्तकं वाचताना लेखकाला काय जाणवायचं?

उत्तर: नवे देश, माणसं, प्रसंग आणि शब्दांची जादू जाणवायची.


२१) लेखकाला भाषेबद्दल काय समजायचं?

उत्तर: भाषेची ताकद आणि लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजायची.


२२) पोपट कुठल्या झाडावर यायचे?

उत्तर: घरामागच्या उंबराच्या झाडावर.


२३) उंबर झाडाचं वर्णन कसं आहे?

उत्तर: पिकलेले उंबर, राघूंचे हिरवे पंख – सुंदर दिसायचं.


२४) कवितेचं बोट लेखकानं कसं धरलं?

उत्तर: चांगलं घट्ट धरलं.


२५) कविता लेखकाकडे कधी यायची?

उत्तर: कवितेला हवं तेव्हा, कधीही मध्यरात्रीसुद्धा.


२६) लेखकाला कवितेची वाट कशी पाहावी लागायची?

उत्तर: कधी कधी खूप वाट पाहावी लागायची.


२७) लेखकाच्या आत्याचं काम कुठे होतं?

उत्तर: उरुळीकांचनच्या मराठी शाळेत.


२८) आत्या किती उशिरा घरी यायची?

उत्तर: रात्री नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत उशिरा यायची.


२९) लेखक आणि भावंडं कोणाची वाट बघायची?

उत्तर: आत्याची वाट बघायची.


३०) म्हातारीच्या वाट पाहण्यातून लेखकाला काय समजतं?

उत्तर: वाट पाहणं हे दुःख-दडपण देणारं असलं तरी तेच गोष्टीचं खरं मोल शिकवतं, संयम देतं आणि आयुष्याची ओढ वाढवतं.


Answer by Dimpee Bora😚